सोमवार, १८ मे, २०१५



प्रिय मैत्रणी
गेले वर्षभर वाट पाहतोय... कसली काय विचारतेस. म्हणजे तुला अद्याप माहिती नाही का? मैत्रिणी, मी जेवढी तुझी आतुरतेने वाट पाहतोय ना तितक्याच आतुरतेने वर्षभरापासून अच्छे दिनांची वाट पाहतोय. आज येतील अच्छे दिन, उद्या येतील अच्छे दिन असे मनाला सांगत आणि तुझ्या त्या खडूस बापाला कसं तरी तोंड देत कधी वर्ष सरलं ते कळलंच नाही बघ? काय माहीत आहे की, अच्छे दिन आले ना मग आपल्यासाठीसद्धा चांगेल दिन येतील. हे बघ असं तू भांडत वैगरे बसू नकोस. म्हणजे मला काय म्हणायचं, तुझ्यातलं आणि माझ्यातलं जे नातं आहे ना ते अगदी पक्कच असायला हवं. युतीसारख आज तुटेल उद्या तुटेल असं नको. काय मजा नाही अशा मैत्रीत. संसार दोघांनी करायचा आणि पुन्हा त्याच्यात वाद घालायचे. यातून भविष्य बिघडतं असं नाही का वाटत तुला. तू तिथं आणि मी इथं असल्यामुळे आजकाल आपल्यात त्या युती सरकारमधील जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पावरून चाललेल्या वादासारखं झालं आहे. एकाने जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध करायाचा आणि दुसऱ्याने प्रकल्प होणारच असा विश्वास व्यक्त करायचा...तुझ्यात आणि माझ्यात नेमके हेच चालले आहे. आता मोदी चीनच्या दौऱ्यावर आहेत तर जरा जपानला यावं जाऊन, असं तुला नाही का वाटत? तेवढेच फुकुशिमा बघून आले असते. असो. आता सरकारने ड्रॅगन समजल्या जाणाऱ्या चीनबरोबर करार केले आहेत, तेव्हा अच्छे दिन 'करा'त येतील अशी माझी भाबडी आशा आहे.
आपल्या प्रेमाला कुणाचं ग्रहण लागू नये यासाठी मी धडपडतोय. तर तुझा बाप अच्छे दिन के पिचे लगा है. गेल्या वर्षभरात अनेक निर्णय घेतले सरकारने, त्याचे फळ केव्हा मिळेल तेव्हा मि‌‌ळेल, पण आपण आशावादी असलं पाहिजे. सरकारचा पाच वर्षांचा संसार केव्हा मोडेल ते सांगता येत नाही, पण आपला संसार, आपलं प्रेम असं न मोडता राहायचं असेल तर सकारात्मक विचार करून स्वत:चं काहीतरी करायला हवं. निदान त्यामुळे तरी तुझे नि माझे अच्छे दिन नक्कीच येतील.
आपला आशावादी प्रेयस





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा