कोलांटउडी
प्रिय मैत्रणी,
अरेच्या सकाळी सकाळीच तुझा फोन..नाही नेहमी मीच फोन करतो ना...थांब हं... सूर्य उत्तरेला मावळणार का ते जरा पाहून येतो. नाही गं, तुझा फोन आल्यामुळे तुझ्या बापाचा विरोध मावळला असंच वाटलं अगदी जैतापूरप्रकरणी शिवसेनेचा विरोध मावळला ना तसंच. काय...काय म्हणतेस..हं तसं नाही गं...तुझा राजकारणाशी काही संबंध नसला ना तरी कोकणवासीयांचा जैतापूरशी अगदी जिव्हाळ्याचा संबंध आहे बरं का! आता त्याचं काय आहे, ताजं ताजं उदाहरण म्हणून शिवसेनेचं दिलं. असे विरोध कालांतराने बोथट होतात यात काय नवीन नाही गं...पण काहीही म्हण हा, तुझ्या बापाने आपल्या प्रेमाला यलो सिग्नल दिला हेही नसे थोडके हं.. म्हणजेच काय त्यांनी थोडीतरी कोलांटउडी मारलीच की आस्ते'कदम'. मला काय वाटतं, फुकुशिमा व चेर्नोबिलला जाण्याचा सल्ला देणाऱ्यांच्या विरोधाचा भाजपने फुंकून फुंकून फुकुशिमा केला तसा तू तुझ्या बापाचा नाही ना केलास? अगं तू नाही केलंस तर मी तरी नक्की फुंकून टाकला असता विरोध फक्त तुझ्यासाठी..काय काय...वरणभाताचं काय म्हणतेस ? छे गं, वरणभात खायची ही काय वेळ आहे का? कोकणी लोकांना सकाळी चटणी-भाकर दिली ना तरी लय भारी न्याहरी होते. पण आता म्हणे जैतापूरप्रकरणी पर्यावरणमंत्र्यांनी केलेल्या विधानाची फारच चर्चा रंगलीय. शेतकऱ्यांनी म्हणे विरोध केला. सत्येत आल्यानंतर असं सांगणे म्हणे सोपं असतं. आता पर्यावरणमंत्र्यांना दुसरे 'वरण' नसल्यामुळे 'पर्याय' काय असा प्रश्न तुला पडला असेल तर तो डोक्यातून आताच डिलीट कर. शेवटी जे काय भाजायचं असतं, शेकवायचं असतं, खापर फोडायचं असतं त्यासाठी सर्वसामान्यांच्या नावाच्या ढालीवर फोडता येतं, नाही का माय डिअर मैत्रणी? मला माहीत आहे तुला राजकारणात काही इंटरेस्ट नाही. आपला दोघांचा इंटरेस्ट मात्र आपल्या प्रेमात आहे. आपण आपलं प्रेमजीवन अगदी यशस्वी करायचं. कितीही अडचणी आल्या तरी दुसऱ्यावर जबाबदारी टाकायची नाही शिवसेनेने जशी शेतकऱ्यांवर टाकली. पण काहीही म्हण, तुझा बाप म्हणजे जरा भारीच आहे. तुझ्यासाठी इतके दिवस मी त्यांच्या मागे मागे लागलो होतो तर त्यांनी मला झुळत ठेवलं अगदी मोदींनी शिवसेनेच्या खासदारांना जैतापूरप्रकरणी निवेदन देताना ठेवलं तसं...तुझ्या बापाचा अस्सा राग आला होता ना, पण करणार काय, सत्तेखाली हात आखडले स्वारी स्वारी तुझ्यावर प्रेम होतं ना म्हणून मी ते सर्व सहन केलं. आणि तुला मी आजच सांगून ठेवतो हं, आपलं हे प्रेम हे अतुट आहे हे लक्षात ठेव. ते काय काही वर्षांच्या 'युती'सारखं नाही.
तुझाच वचनबद्ध,
प्रेयस
प्रिय मैत्रणी,
अरेच्या सकाळी सकाळीच तुझा फोन..नाही नेहमी मीच फोन करतो ना...थांब हं... सूर्य उत्तरेला मावळणार का ते जरा पाहून येतो. नाही गं, तुझा फोन आल्यामुळे तुझ्या बापाचा विरोध मावळला असंच वाटलं अगदी जैतापूरप्रकरणी शिवसेनेचा विरोध मावळला ना तसंच. काय...काय म्हणतेस..हं तसं नाही गं...तुझा राजकारणाशी काही संबंध नसला ना तरी कोकणवासीयांचा जैतापूरशी अगदी जिव्हाळ्याचा संबंध आहे बरं का! आता त्याचं काय आहे, ताजं ताजं उदाहरण म्हणून शिवसेनेचं दिलं. असे विरोध कालांतराने बोथट होतात यात काय नवीन नाही गं...पण काहीही म्हण हा, तुझ्या बापाने आपल्या प्रेमाला यलो सिग्नल दिला हेही नसे थोडके हं.. म्हणजेच काय त्यांनी थोडीतरी कोलांटउडी मारलीच की आस्ते'कदम'. मला काय वाटतं, फुकुशिमा व चेर्नोबिलला जाण्याचा सल्ला देणाऱ्यांच्या विरोधाचा भाजपने फुंकून फुंकून फुकुशिमा केला तसा तू तुझ्या बापाचा नाही ना केलास? अगं तू नाही केलंस तर मी तरी नक्की फुंकून टाकला असता विरोध फक्त तुझ्यासाठी..काय काय...वरणभाताचं काय म्हणतेस ? छे गं, वरणभात खायची ही काय वेळ आहे का? कोकणी लोकांना सकाळी चटणी-भाकर दिली ना तरी लय भारी न्याहरी होते. पण आता म्हणे जैतापूरप्रकरणी पर्यावरणमंत्र्यांनी केलेल्या विधानाची फारच चर्चा रंगलीय. शेतकऱ्यांनी म्हणे विरोध केला. सत्येत आल्यानंतर असं सांगणे म्हणे सोपं असतं. आता पर्यावरणमंत्र्यांना दुसरे 'वरण' नसल्यामुळे 'पर्याय' काय असा प्रश्न तुला पडला असेल तर तो डोक्यातून आताच डिलीट कर. शेवटी जे काय भाजायचं असतं, शेकवायचं असतं, खापर फोडायचं असतं त्यासाठी सर्वसामान्यांच्या नावाच्या ढालीवर फोडता येतं, नाही का माय डिअर मैत्रणी? मला माहीत आहे तुला राजकारणात काही इंटरेस्ट नाही. आपला दोघांचा इंटरेस्ट मात्र आपल्या प्रेमात आहे. आपण आपलं प्रेमजीवन अगदी यशस्वी करायचं. कितीही अडचणी आल्या तरी दुसऱ्यावर जबाबदारी टाकायची नाही शिवसेनेने जशी शेतकऱ्यांवर टाकली. पण काहीही म्हण, तुझा बाप म्हणजे जरा भारीच आहे. तुझ्यासाठी इतके दिवस मी त्यांच्या मागे मागे लागलो होतो तर त्यांनी मला झुळत ठेवलं अगदी मोदींनी शिवसेनेच्या खासदारांना जैतापूरप्रकरणी निवेदन देताना ठेवलं तसं...तुझ्या बापाचा अस्सा राग आला होता ना, पण करणार काय, सत्तेखाली हात आखडले स्वारी स्वारी तुझ्यावर प्रेम होतं ना म्हणून मी ते सर्व सहन केलं. आणि तुला मी आजच सांगून ठेवतो हं, आपलं हे प्रेम हे अतुट आहे हे लक्षात ठेव. ते काय काही वर्षांच्या 'युती'सारखं नाही.
तुझाच वचनबद्ध,
प्रेयस