शुक्रवार, ४ नोव्हेंबर, २०११
मौनव्रत सोड ना गडे....
चला मौनव्रत सोडूया
प्रिय मैत्रणी,
गुड मॉर्निंग........................ अगदी एफएमवाले सकाळीच आरोळी ठोकतात तसं वाटलं का... ऊठ लवकर... अन् हो पेपरवैगरे वाचवास की नाही... बरं मग कुठलं चॅनेल तरी पाहिलंस का.... अगं, बोलत का नाहीस... तुझं मौनव्रत आहे का...मी फोनवरून एवढं कोकळंतोय... हे बघ मैत्रिणी, अण्णांनी मौनव्रत धरलं ते त्यांच्या तब्येतीसाठी... तू तर एकदम फिट आहेस... अगं बोल....मी काय म्हणतो, ज्यांना बोलायची, बडबडायची सवय असते त्यांनी मौनव्रत धरू नये... मला असं नाही म्हणायचं की लोकपाल बिलाच्या वेळी अण्णा जेवढे बोलले तेवढं तू बोललीस... पण अण्णांनी गप्प राहणं बहुतेक अण्णांच्या आतल्या मनाला काय ते अंतर्मनाला पटत होतं का हे त्यांचा प्रश्न आहे... तुझा नाही... अण्णा गप्प होते तेव्हा अनेकांनी बोलण्याच्या पोळ्या भाजून घेतल्या... जाऊ दे... ते सर्व राहू दे बाजूला... तू केव्हा आणि कशासाठी मौनव्रत धारण केलंस ते बोल.... माझ्याकडून काही चूक झाली का राणी... हे बघ आपण सर्वसामान्य माणसे... अण्णा मनातलं ओठावर थांबवू शकतात... तसं तुझं नाही... तू किती बोलघेवडी आहेस ना ते मला माहीत आहे... तुला काय वाटतं, अण्णांवर आणि टीम अण्णांवर जे आरोप होत होते त्यांचे उत्तर न देण्यासाठी अण्णांनी मौनव्रत धारण केले होते... की बोलणा-यांनी आता अती केल्यामुळे त्यांनी मौनव्रत सोडले... बघ हा त्यांचा प्रश्न आहे... तुला त्याच्यावर काही भाष्य करायचे नसेल तर तू माझ्याशी अबोला कशाला धरलास...
हा अबोला सोड बघू आणि पुन्हा पूर्वीसारखं गोड गोड बोल...
काय... चक्क हसलीस... किती गोड.... आता कसा गेला रुसवा बयेचा माझा...
तुझाचा तुला बोलता करणारा,
प्रेयस
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा