प्रिय मैत्रणी...
गुड मॉर्निंग... वा किती छान... मी तुला म्हटलं आणि तू चक्क मौनव्रत सोडलंस... क्या बात है... हे बघ तू मौनव्रत सोडलंस याचा अर्थ असा नाही की तू माझ्यावर रागाचा आगडोंब ओकशील... नाही तसं नव्हे काय असतं मैत्रणी, मौनव्रत केल्यावर मनात खूप असं साचून राहतं... ते कुणाकडे तरी सांगावंस वाटतं सामान्य लोकांना... तू नक्की सांग मी आहे ना तुझा हक्काचा, प्रेमाचा प्रेयस... अगं आता तरी हूं हूं करणं सोड सखे... मी काय तुला अण्णा हजारेंची पदवी देणार नाही... त्यांनी म्हणे मौनव्रत सोडल्यावर असा काही सपाटा लावला बोलायचा... म्हणे एका एकाला धारेवर धरलं... ख-या अर्थानं काही गोष्टी नाही उघड करायच्या...पण पत्रकारांच्या नाही ओठात राहात नाही पोटात... असं म्हटलं जातं... केव्हा एकदा जगाला सांगतो असं होतं...माझंही तसंच झालं...तू मौनव्रत सोडलंस याचा काय आनंद झाला म्हणून सांगू... तो आता सर्वांना सांगायचा आहे... तू तशी काय कुणाशी आणि कुणाला बोलणार नाही हे मला माहीत आहे... कारण तू काही अण्णांसारखी सेलिब्रिटी नाहीस... मीडियासाठी नाहीस तसेच न्यूजमेकर नाहीस... आपण आपलं सामान्य असलेलं बरं नाही का... हे बघ आता तू व्रत सोडलंस आहेस तर आपण भेटूया एकांतात आणि एवढ्या दिवस मुके झालेले शब्द तुझे येऊ दे ओठावर....कारण तुझी बडबड ही माझ्यासाठी मोठा एकांतच असतो... तू बोलायला लागलीस अन् माझी विजनवास संपला बघ... अण्णा काय म्हणतात ते म्हणू दे... तू अशी धावत ये....भरभरून बोलायला....
तुझाच बोलका बडबड्या,
प्रेयस
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा