प्रिय मैत्रणी,
गुड मॉर्निंग, अगं, एक आनंदाची बातमी सांगायचीय तुला... सांगावीच लागणार... तुला वर्तमानपत्रं वाचायला नकोत अन् न्यूज पाहायला नकोत... पुस्तकं वाचतेस हेच मोठं नशीब... अशी आवासून पाहू नकोस... तयारीला लाग आदी... बॅग भर... अगं, कुठून पळून जायचंय नाही... मग, कुठं जायचा असा प्रश्न पडला असेल ना तुला... सांगतो हं... हे बघ आपल्याला ना सांगलीत जायचंय, सांगलीत... सांगलीत, असा प्रश्नार्थक चेहरा करू नकोस... सांगलीत ९२ वं नाट्यसंमेलन भरणार आहे ना... त्यासाठी जायचंय... २२ आणि २३ जानेवारीला... आणि आनंदाची गोष्ट म्हणजे अध्यक्षपदी ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघेंची निवड झालीय... झक्कास... आपल्याला वर्षे नाही ना झालीत एवढी नाट्यसंमलनं झालीत... सांगलीच्या संमेलनात वादावादी न करता तुला भेटायला आवडेल मला... कदाचित एकादी कविता नाहीतर चारोळी तरी सुचेल तुझ्यावरून... तेवढीच सादर करू... हे बघ, साहित्यिक-पत्रकार-राजकारणी वाद असायचे तर असू दे...तुझ्या अन् माझ्यात मात्र वाद नको...कळंल का... अन् हो स्वागताला डॉक्टर आहेतच की... म्हणजे काय म्हणजे...तुला प्रत्येक गोष्ट आता भरवायला लावू नकोस हं... अगं, डॉक्टर पतंगराव कदम आहेत स्वागताला... तसेच अनेक थोरामोठ्या साहित्यिकांच्या गाठीभेटी होतीलच की... थोर नाटककार, कलावंत, रंगकर्मी अन् कोण कोण भेटतील म्हणू सांगू... ते जाऊ दे...प्रत्यक्षच पाहू...मोघेंना तर सासूरवाशिणीला माहेरी आल्यानंतर होणा-या आनंदाची अनुभूती आलीय म्हणे... असू दे... त्यांच्या आनंदात आपला आनंदही साजरा करू...इकडे मुंबईत म्हणे जयवंत परबांना शिवसेनागृही परतल्यानंतर तसली अनुभूती आलीय... शेवटी माहेरपणाचा थाट काही मोठा आणि औरच... तू अशी बेळगाववाशी अन् मी मुंबईकर... दोघांनी मिळून आता सांगलीकर होऊया... कशी वाटली कल्पना... हा पण तुला सारखंसारखं राजकारण्यांसारखं स्वगृही नाही हा जाता येणार... चल, मी निघालो....कुठे काय विचारतेस... सांगलीचं तिकीट बुक करून येतो...नंतर बसू बोलत दोघं -जण नाट्यनिर्मितीपासून नाट्यसमीक्षेपर्यंत...
तुझाच संमेलनवेडा,
प्रेयस
रविवार, २७ नोव्हेंबर, २०११
गुरुवार, २४ नोव्हेंबर, २०११
ती वीज तुझ्या नजरेमधली...
प्रिय मैत्रणी,
गुड मॉर्निंग... अगं अजून डोळे काय झाकून आहेस... सूर्य महाराजांचं केव्हाच आगमन झालंय माथ्यावर अन तू म्हणतेस डोळे चुरचुरतायंत... कॉलेजलाही तू अशीच डोळे मिचमिचवीत असायचीस... अगदी झोपेतनं उठल्यासारखी... पण काहीही म्हण तुझी नजर मात्र सॉलिड भेदक होती... तुझी ती नजर पाहिली ना की कशाची उपमा देऊ हा माझ्या नजरेला प्रश्न पडायचा... असं वाटायचं की, शोएब अख्तरचा नो बॉलही एवढा वेगात येत नसेल... तुझी ती भेदक नजर संपूर्ण क्लासवर भरभरली की क्लास प्रकाशमान वाटायचा... माहीत आहे ना मराठीचे प्राध्यापक काय म्हणायचे ते... मुली अशा जागा पकडतात की एका नजरेत ३६० चा अँगल असतो... ते जाऊ दे... हे मात्र खरं की त्या नजरेनं माझी विकेट घेतली...आय मीन मला बोल्ड केलं... तुझ्या त्या सुंदर नजरेचे कांगोरे मला नेहमीच हवेहवेसे वाटायचे... तुझे ते नयन पाहिले की एश्वर्या रायच्या डोळ्यांचं सौंदर्यही खुजं वाटायचं... आठवतं तुला... तू कॉलेजच्या बागेत फिरत होतीस... आणि मी असा चाफा बोले ना सारखा पांढ-या चाफ्याच्या मुदात एकलव्यासारखा बसून होतो... फूलझाडागणिक आणि चेह-यावरील हास्यागणिक बदलणारी तुझी नजर मला घायाल करायची... एकदा तर तुझ्या नजरेनं माझं हृद्य इतकं घायाल झालं की दिलाच्या आकाराचे तुकडे सांभाळताना नाकीनऊ आले माझ्या... तुझं ते डोक्याला हात लावून तिरक्या नजरेनं पाहणं... गार्डनमध्ये बसल्यावर मान वळवून पाहणं... चौपाटीवर फिरताना वा-याच्या लकेरीअगोदर तुझ्या डोळ्याची पापणी लवणं... अन् निरोप घेताना पुन्हा पुन्हा पाहणं... सर्व कसं हृदयात साठवून ठेवणारं... मनात जपून राहणारं... डोळ्यात बसून राहणारं... फक्त स्वप्नवत...मला तर सारखं वाटायचं मी सोडला तर कुणाची बिशाद होती तुझ्या नजरेला नजर मिळवायची... तरी तुला सांगतो... तू माधुरी दीक्षितसारखी नजरे मिळवलीस की माझा माभ संजय कपूर व्हायचा राजा सिनेमातल्यासारखा... पण तुझ्या नजरेसमोर माझी जिगर असायची हे विसरू नको हं...मला प्रेमात पाडणारी तुझी नजर मात्र शामल नव्हती...ती वीज तुझ्या नजरेमधली...जीवाला वेड लावणारी... प्रेमात पाडणारी... आजन्म नजरेत ठेवणारी.... शेवटी एकच म्हणावसं वाटतं की, ती वीज तुझ्या नजरेमधली...अन् गालावर माझ्या खुलली खळी....
तुझाच नजरकैदी,
प्रेयस
गुड मॉर्निंग... अगं अजून डोळे काय झाकून आहेस... सूर्य महाराजांचं केव्हाच आगमन झालंय माथ्यावर अन तू म्हणतेस डोळे चुरचुरतायंत... कॉलेजलाही तू अशीच डोळे मिचमिचवीत असायचीस... अगदी झोपेतनं उठल्यासारखी... पण काहीही म्हण तुझी नजर मात्र सॉलिड भेदक होती... तुझी ती नजर पाहिली ना की कशाची उपमा देऊ हा माझ्या नजरेला प्रश्न पडायचा... असं वाटायचं की, शोएब अख्तरचा नो बॉलही एवढा वेगात येत नसेल... तुझी ती भेदक नजर संपूर्ण क्लासवर भरभरली की क्लास प्रकाशमान वाटायचा... माहीत आहे ना मराठीचे प्राध्यापक काय म्हणायचे ते... मुली अशा जागा पकडतात की एका नजरेत ३६० चा अँगल असतो... ते जाऊ दे... हे मात्र खरं की त्या नजरेनं माझी विकेट घेतली...आय मीन मला बोल्ड केलं... तुझ्या त्या सुंदर नजरेचे कांगोरे मला नेहमीच हवेहवेसे वाटायचे... तुझे ते नयन पाहिले की एश्वर्या रायच्या डोळ्यांचं सौंदर्यही खुजं वाटायचं... आठवतं तुला... तू कॉलेजच्या बागेत फिरत होतीस... आणि मी असा चाफा बोले ना सारखा पांढ-या चाफ्याच्या मुदात एकलव्यासारखा बसून होतो... फूलझाडागणिक आणि चेह-यावरील हास्यागणिक बदलणारी तुझी नजर मला घायाल करायची... एकदा तर तुझ्या नजरेनं माझं हृद्य इतकं घायाल झालं की दिलाच्या आकाराचे तुकडे सांभाळताना नाकीनऊ आले माझ्या... तुझं ते डोक्याला हात लावून तिरक्या नजरेनं पाहणं... गार्डनमध्ये बसल्यावर मान वळवून पाहणं... चौपाटीवर फिरताना वा-याच्या लकेरीअगोदर तुझ्या डोळ्याची पापणी लवणं... अन् निरोप घेताना पुन्हा पुन्हा पाहणं... सर्व कसं हृदयात साठवून ठेवणारं... मनात जपून राहणारं... डोळ्यात बसून राहणारं... फक्त स्वप्नवत...मला तर सारखं वाटायचं मी सोडला तर कुणाची बिशाद होती तुझ्या नजरेला नजर मिळवायची... तरी तुला सांगतो... तू माधुरी दीक्षितसारखी नजरे मिळवलीस की माझा माभ संजय कपूर व्हायचा राजा सिनेमातल्यासारखा... पण तुझ्या नजरेसमोर माझी जिगर असायची हे विसरू नको हं...मला प्रेमात पाडणारी तुझी नजर मात्र शामल नव्हती...ती वीज तुझ्या नजरेमधली...जीवाला वेड लावणारी... प्रेमात पाडणारी... आजन्म नजरेत ठेवणारी.... शेवटी एकच म्हणावसं वाटतं की, ती वीज तुझ्या नजरेमधली...अन् गालावर माझ्या खुलली खळी....
तुझाच नजरकैदी,
प्रेयस
शनिवार, १९ नोव्हेंबर, २०११
चल, हटके क्लास काढू
प्रिय मैत्रणी,
गुड मॉर्निंग... अगं ऊठ लवकर... आनंदाची बातमी सांगायची आहे... आता आपल्याला व्यवसायासाठी सुवर्णसंधीच प्राप्त झालीय... कुठली असं काय विचारतेस... न्यूज चॅनेल्स पाहात नाही का तू... अगं, राजसाहेबांनी चक्क आपल्या उमेदवारांसाठी परीक्षा जाहीर केलीय... राज सरांनी क्लासच घेतला म्हणे...आता इच्छुक उमेदवार परीक्षा देणार म्हणजे त्यांना वाचावं-लिहावं लागणार... याचाच साधा अर्थ त्यांना क्लासला जावं लागणार... कोहिनूरने क्लास काढायच्या अगोदर आपला क्लास सुरू झाला पाहिजे... कळलं... आणि हो आपण क्लास काढला तर तो तोट्यात जाणार नाही... कारण काय विचारतेस... अगं, निवडणुकांमागून निवडणुका नाही का होतात... मग नो टेन्शन फक्त अटेन्शन... राजसाहेबांनी परीक्षा घ्यायची ठरवलीय...आपण त्या परीक्षेचा फॉर्म्युला ठरवू... फॉर्म्युला वनप्रमाणे चालेल क्लास... फक्त एकदाच जाहिरात देऊ... उमदेवारांना योग्य प्रशिक्षण देणारा एकमेव क्लास...बघ, रांगाच रांगा लागतील क्लाससमोर...उमेदवारी विद्यार्थ्यांच्या... आणि हो आपल्या क्लासला काय एकाच पक्षाचे थोडे उमेदवार येणार आहेत... सर्वच पक्षांचे उमेदवार हे आपले विद्यार्थी असतील... एका पक्षातून दुस-या पक्षात जाणं हा तर आपल्याकडचा ट्रेण्ड आहे... त्यामुळे आपला क्लास सर्वपक्षीयांना उपयुक्त ठरेल...आणि हो, मी काय म्हणतो, जर आपण उमेदवारीच्या प्रशिक्षणावर पुस्तक काढले ना तर तुफान चालेल...वृत्याच्या वृत्या म्हणजे आवृत्या काढाव्या लागतील... तू काही टेन्शन घेऊ नकोस... हा, आता तू शिक्षकांचा प्रश्न उपस्थित केलास हे बरं केलंस... पण घाबरू नकोस... मी आहे ना खंबीर... आपल्याकडे अनेक जण पदव्या घेऊन बेकार आहेत... येतील ते शिकवायला... बाकी काहीही असो... राजसाहेबांनी परीक्षा घेण्याचा ट्रेण्ड सुरू केला पण मला मात्र माझा व्यवसाय करण्याची नामी संधी मिळाली असं वाटतंय... तुला काय वाटायचं ते वाटो...आणि हो... सांगायचं राहूनच गेलं... माझ्या क्लासचे गेस्ट लेक्चरर असतील कोण... ते मात्र तू गेस करून सांग....
तुझाच क्लासवेडा,
प्रेयस
शुक्रवार, ११ नोव्हेंबर, २०११
सीमावादाची ५५ वर्षे
प्रिय मैत्रणी,
गुड मॉर्निंग, अगं ही काय आळोखे देत उठण्याची वेळ आहे का? लोक वादावादासाठी रस्त्यावर उतरलेत अन् तू एक अजून बेड टी घेतेस... आज कसला आलाय वाद असा प्रेमळ स्वरात प्रश्न विचारू नकोस... गेली ५५ वर्षे सुरू आहे वादावादी... अगं, तू हा वाद कशीकाय विसरलीस? सीमावाद म्हणतोय मी... सीमावाद असा प्रश्नार्थक प्रश्न विचारू नकोस... महाराष्ट्र-कर्नाटक वादाला पाढे पंच्चावण.. स्वारी, पुरी ५५ वर्षे झालीत... वाद आवरण्याची वेळ आलीय, पण दोन्ही राज्ये सीमावाद जोपासण्याचा कसोशीने म्हणे प्रयत्न करतायत... आता सीमावादाचं भवितव्य सुप्रीम कोर्टाच्या हातात... असू दे... तोपर्यंत दरवर्षी हा सीमावाद दहशतवादासारखा डोकं वर काढणार आहे...तोडफोड, हाणामारी, जाळपोळ, काळं फासणं, रास्ता रोको या शब्दांनाही आता लाज वाटेल इतका वाद ताणला गेलाय असं नाही का तुला वाटत? एक वेळ रबर ताणला तर तुटेल पण असले वाद सुटणारही नाहीत आणि तुटणारही नाहीत... वाद सोडविण्यापेक्षा वाद कुजविण्याचं कौशल्या वादातीत आहे... वादाच्या विस्तवावर राजकारण्यांनी पोळ्या भाजण्याचंच कर्तृत्व केलंय... ज्या शिवसेनेनं सीमावादात उडी घेतली त्या शिवसेनेला संधी असतानाही सीमावाद सोडवता आला नाही.... मला काय म्हणायचंय हे तुला कळतंय ना.... तू अशी बेळगाववासिनी अन् मी असा महाराष्ट्रवासी... आपल्यात मात्र असा वाद होऊ देऊ नकोस...सीमाबांधवांना आता कोणताही पक्ष वाली राहिलेला नसला तरी मी तुझा वाली आहे... आणि म्हणून मी खंबीरपणे तुझ्या पाठीशी उभा आहे... सीमाभागातील जनतेचं आयुष्य असं होरपळून निघतंय...तसं तुझं आयुष्य मी होरपळू नाही देणार...हा माझा वचननामा आहे....मला काय म्हणायचंय... मुंबईच्या फर्लांगभर असणारे वाडे, पाडे, वाड्यावस्त्या आज उपोषण, कुपोषण आणि घोटभर पाण्यासाठी घटका मोजतायंत, शेतकरी आत्महत्या करतायंत, ऊस, कांदा, कापसाचा प्रश्न आहेच पाचवीला पुजलेला... मग बेळगाववासीयांना महाराष्ट्रात घेतलं तर खरंच आपण संगोपन करू का त्यांचं, हा प्रश्न आहेच.... बघ, हे सर्व बाजूला ठेव आणि माझ्यावरच्या पूर्ण विश्वासानं तू महाराष्ट्रीय हो... तुला सांभाळण्यासाठी मी समर्थ आहे... ५५ वर्षांपर्यंत वाटेला डोळे लावून वाट बघायला लावणार नाही तुला हा माझा शब्द...
तुला सामावून घेणारा तुझाच,
प्रेयस
गुड मॉर्निंग, अगं ही काय आळोखे देत उठण्याची वेळ आहे का? लोक वादावादासाठी रस्त्यावर उतरलेत अन् तू एक अजून बेड टी घेतेस... आज कसला आलाय वाद असा प्रेमळ स्वरात प्रश्न विचारू नकोस... गेली ५५ वर्षे सुरू आहे वादावादी... अगं, तू हा वाद कशीकाय विसरलीस? सीमावाद म्हणतोय मी... सीमावाद असा प्रश्नार्थक प्रश्न विचारू नकोस... महाराष्ट्र-कर्नाटक वादाला पाढे पंच्चावण.. स्वारी, पुरी ५५ वर्षे झालीत... वाद आवरण्याची वेळ आलीय, पण दोन्ही राज्ये सीमावाद जोपासण्याचा कसोशीने म्हणे प्रयत्न करतायत... आता सीमावादाचं भवितव्य सुप्रीम कोर्टाच्या हातात... असू दे... तोपर्यंत दरवर्षी हा सीमावाद दहशतवादासारखा डोकं वर काढणार आहे...तोडफोड, हाणामारी, जाळपोळ, काळं फासणं, रास्ता रोको या शब्दांनाही आता लाज वाटेल इतका वाद ताणला गेलाय असं नाही का तुला वाटत? एक वेळ रबर ताणला तर तुटेल पण असले वाद सुटणारही नाहीत आणि तुटणारही नाहीत... वाद सोडविण्यापेक्षा वाद कुजविण्याचं कौशल्या वादातीत आहे... वादाच्या विस्तवावर राजकारण्यांनी पोळ्या भाजण्याचंच कर्तृत्व केलंय... ज्या शिवसेनेनं सीमावादात उडी घेतली त्या शिवसेनेला संधी असतानाही सीमावाद सोडवता आला नाही.... मला काय म्हणायचंय हे तुला कळतंय ना.... तू अशी बेळगाववासिनी अन् मी असा महाराष्ट्रवासी... आपल्यात मात्र असा वाद होऊ देऊ नकोस...सीमाबांधवांना आता कोणताही पक्ष वाली राहिलेला नसला तरी मी तुझा वाली आहे... आणि म्हणून मी खंबीरपणे तुझ्या पाठीशी उभा आहे... सीमाभागातील जनतेचं आयुष्य असं होरपळून निघतंय...तसं तुझं आयुष्य मी होरपळू नाही देणार...हा माझा वचननामा आहे....मला काय म्हणायचंय... मुंबईच्या फर्लांगभर असणारे वाडे, पाडे, वाड्यावस्त्या आज उपोषण, कुपोषण आणि घोटभर पाण्यासाठी घटका मोजतायंत, शेतकरी आत्महत्या करतायंत, ऊस, कांदा, कापसाचा प्रश्न आहेच पाचवीला पुजलेला... मग बेळगाववासीयांना महाराष्ट्रात घेतलं तर खरंच आपण संगोपन करू का त्यांचं, हा प्रश्न आहेच.... बघ, हे सर्व बाजूला ठेव आणि माझ्यावरच्या पूर्ण विश्वासानं तू महाराष्ट्रीय हो... तुला सांभाळण्यासाठी मी समर्थ आहे... ५५ वर्षांपर्यंत वाटेला डोळे लावून वाट बघायला लावणार नाही तुला हा माझा शब्द...
तुला सामावून घेणारा तुझाच,
प्रेयस
रविवार, ६ नोव्हेंबर, २०११
व्रत बंद अन् बडबड सुरू
प्रिय मैत्रणी...
गुड मॉर्निंग... वा किती छान... मी तुला म्हटलं आणि तू चक्क मौनव्रत सोडलंस... क्या बात है... हे बघ तू मौनव्रत सोडलंस याचा अर्थ असा नाही की तू माझ्यावर रागाचा आगडोंब ओकशील... नाही तसं नव्हे काय असतं मैत्रणी, मौनव्रत केल्यावर मनात खूप असं साचून राहतं... ते कुणाकडे तरी सांगावंस वाटतं सामान्य लोकांना... तू नक्की सांग मी आहे ना तुझा हक्काचा, प्रेमाचा प्रेयस... अगं आता तरी हूं हूं करणं सोड सखे... मी काय तुला अण्णा हजारेंची पदवी देणार नाही... त्यांनी म्हणे मौनव्रत सोडल्यावर असा काही सपाटा लावला बोलायचा... म्हणे एका एकाला धारेवर धरलं... ख-या अर्थानं काही गोष्टी नाही उघड करायच्या...पण पत्रकारांच्या नाही ओठात राहात नाही पोटात... असं म्हटलं जातं... केव्हा एकदा जगाला सांगतो असं होतं...माझंही तसंच झालं...तू मौनव्रत सोडलंस याचा काय आनंद झाला म्हणून सांगू... तो आता सर्वांना सांगायचा आहे... तू तशी काय कुणाशी आणि कुणाला बोलणार नाही हे मला माहीत आहे... कारण तू काही अण्णांसारखी सेलिब्रिटी नाहीस... मीडियासाठी नाहीस तसेच न्यूजमेकर नाहीस... आपण आपलं सामान्य असलेलं बरं नाही का... हे बघ आता तू व्रत सोडलंस आहेस तर आपण भेटूया एकांतात आणि एवढ्या दिवस मुके झालेले शब्द तुझे येऊ दे ओठावर....कारण तुझी बडबड ही माझ्यासाठी मोठा एकांतच असतो... तू बोलायला लागलीस अन् माझी विजनवास संपला बघ... अण्णा काय म्हणतात ते म्हणू दे... तू अशी धावत ये....भरभरून बोलायला....
तुझाच बोलका बडबड्या,
प्रेयस
गुड मॉर्निंग... वा किती छान... मी तुला म्हटलं आणि तू चक्क मौनव्रत सोडलंस... क्या बात है... हे बघ तू मौनव्रत सोडलंस याचा अर्थ असा नाही की तू माझ्यावर रागाचा आगडोंब ओकशील... नाही तसं नव्हे काय असतं मैत्रणी, मौनव्रत केल्यावर मनात खूप असं साचून राहतं... ते कुणाकडे तरी सांगावंस वाटतं सामान्य लोकांना... तू नक्की सांग मी आहे ना तुझा हक्काचा, प्रेमाचा प्रेयस... अगं आता तरी हूं हूं करणं सोड सखे... मी काय तुला अण्णा हजारेंची पदवी देणार नाही... त्यांनी म्हणे मौनव्रत सोडल्यावर असा काही सपाटा लावला बोलायचा... म्हणे एका एकाला धारेवर धरलं... ख-या अर्थानं काही गोष्टी नाही उघड करायच्या...पण पत्रकारांच्या नाही ओठात राहात नाही पोटात... असं म्हटलं जातं... केव्हा एकदा जगाला सांगतो असं होतं...माझंही तसंच झालं...तू मौनव्रत सोडलंस याचा काय आनंद झाला म्हणून सांगू... तो आता सर्वांना सांगायचा आहे... तू तशी काय कुणाशी आणि कुणाला बोलणार नाही हे मला माहीत आहे... कारण तू काही अण्णांसारखी सेलिब्रिटी नाहीस... मीडियासाठी नाहीस तसेच न्यूजमेकर नाहीस... आपण आपलं सामान्य असलेलं बरं नाही का... हे बघ आता तू व्रत सोडलंस आहेस तर आपण भेटूया एकांतात आणि एवढ्या दिवस मुके झालेले शब्द तुझे येऊ दे ओठावर....कारण तुझी बडबड ही माझ्यासाठी मोठा एकांतच असतो... तू बोलायला लागलीस अन् माझी विजनवास संपला बघ... अण्णा काय म्हणतात ते म्हणू दे... तू अशी धावत ये....भरभरून बोलायला....
तुझाच बोलका बडबड्या,
प्रेयस
शुक्रवार, ४ नोव्हेंबर, २०११
मौनव्रत सोड ना गडे....
चला मौनव्रत सोडूया
प्रिय मैत्रणी,
गुड मॉर्निंग........................ अगदी एफएमवाले सकाळीच आरोळी ठोकतात तसं वाटलं का... ऊठ लवकर... अन् हो पेपरवैगरे वाचवास की नाही... बरं मग कुठलं चॅनेल तरी पाहिलंस का.... अगं, बोलत का नाहीस... तुझं मौनव्रत आहे का...मी फोनवरून एवढं कोकळंतोय... हे बघ मैत्रिणी, अण्णांनी मौनव्रत धरलं ते त्यांच्या तब्येतीसाठी... तू तर एकदम फिट आहेस... अगं बोल....मी काय म्हणतो, ज्यांना बोलायची, बडबडायची सवय असते त्यांनी मौनव्रत धरू नये... मला असं नाही म्हणायचं की लोकपाल बिलाच्या वेळी अण्णा जेवढे बोलले तेवढं तू बोललीस... पण अण्णांनी गप्प राहणं बहुतेक अण्णांच्या आतल्या मनाला काय ते अंतर्मनाला पटत होतं का हे त्यांचा प्रश्न आहे... तुझा नाही... अण्णा गप्प होते तेव्हा अनेकांनी बोलण्याच्या पोळ्या भाजून घेतल्या... जाऊ दे... ते सर्व राहू दे बाजूला... तू केव्हा आणि कशासाठी मौनव्रत धारण केलंस ते बोल.... माझ्याकडून काही चूक झाली का राणी... हे बघ आपण सर्वसामान्य माणसे... अण्णा मनातलं ओठावर थांबवू शकतात... तसं तुझं नाही... तू किती बोलघेवडी आहेस ना ते मला माहीत आहे... तुला काय वाटतं, अण्णांवर आणि टीम अण्णांवर जे आरोप होत होते त्यांचे उत्तर न देण्यासाठी अण्णांनी मौनव्रत धारण केले होते... की बोलणा-यांनी आता अती केल्यामुळे त्यांनी मौनव्रत सोडले... बघ हा त्यांचा प्रश्न आहे... तुला त्याच्यावर काही भाष्य करायचे नसेल तर तू माझ्याशी अबोला कशाला धरलास...
हा अबोला सोड बघू आणि पुन्हा पूर्वीसारखं गोड गोड बोल...
काय... चक्क हसलीस... किती गोड.... आता कसा गेला रुसवा बयेचा माझा...
तुझाचा तुला बोलता करणारा,
प्रेयस
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)