प्रिय मैत्रणी,
गुड मॉर्निंग, कसं काय चाललंय? अरे वा, तू तर आज खूपच खुशीत दिसतेस. म्हणजे अभिज्ञान अकादमीला भेट दिल्यानंतर नवचैतन्य संचारलं वाटतं. बरं, त्या दिवशी अकादमीबाबत सांगता सांगता मी एवढा भारावून गेलो म्हणून सांगू... त्या भारावलेपणात एक गोष्ट सांगायची राहूनच गेली. तुझी उत्कंठा वाढली ना! सांगतो. अभिज्ञान अकादमी सर्वांसाठी सर्वांगसुंदर असं 'पालकपर्व' नियतकालिक प्रकाशित करणार आहे. हे ऐकून आनंदाच्या उकळ्या फुटल्या ना...ऐकू येतायत मला. आता पालकपर्वमध्ये काय काय असेल ते विचारू नकोस. जे जे पालकांना हवं ते ते सर्व काही.
आपल्या या पालकपर्वमध्ये अथपासून इथपर्यंत सर्वच असणार आहे. शिक्षणव्यवस्था, परीक्षापद्धती, स्पर्धा, करिअर, विवाहबंध, मातृत्व आणि पितृत्व, नातेसंबंध, सामाजिक भान, स्नेहबंध, सेवाभाव, कार्य, विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षकसंस्था, साहित्य, संस्कृती, कलाविष्कार, नवता, ज्ञान-विज्ञान, तंत्रज्ञान, अभिज्ञान, आचार-विचार, उच्चार, विहार, वेळ, नियोजन कौशल्य, व्यवस्थापन, घर, शाळा, परिसर, समाज अशा वैविध्यपूर्ण विषयांनी पालकपर्व सजलेला, नटलेला, आकर्षक, देखणा आणि वैशिष्ट्यपूर्ण असेल.
एवढंच नव्हे तर पालकपर्वमधून मूलभूत रचनावादी शिक्षणासाठी विधायक भूमिकाही मांडली जाणार आहे. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी शास्त्रीय मांडणी केली जाणार आहे. पाल्याचा अभ्यास, वर्तन आणि करिअरच्या तंत्राचाही समावेश असणार आहे. सुजाण पालकत्वासाठी नवा विचार आणि योग्य दृष्टिकोन मांडला जाणार आहे.
चोखंदळ, चिकित्सक आणि चौकस वाचनासाठी साक्षेपी, सर्जनशील आणि सरस लेखनासाठी, विचार, भूमिका आणि सैद्धांतिक संपादनासाठी, अर्थपूर्ण, कल्पक आणि आशयगर्भ कलानिर्देशनासाठी दर्जेदार आणि संग्राह्य असा पालकपर्व असेल. ललित-वैचारिक जीवनाविषयीचा 'मूलमंत्र' देणारं नियतकालिक म्हणजे 'पालकपर्व.' अगं, म्हणूनच तर अशा लाडक्या, देखण्या, दर्जेदार, चोखंदळ नियतकालिकाचं नाव ठेवलंय 'पालकपर्व.'
मैत्रणी ऐकलंस ना हे सारं... मग आता तू तुझ्या मित्र-मैत्रिणींना पालकपर्वविषयी प्रेमानं सांग आणि त्यांना सभासद बनविण्याचा सपाटा लाव.
तुझाच सभासदांसाठी झपाटलेला,
प्रेयस
बुधवार, १४ डिसेंबर, २०११
रविवार, ४ डिसेंबर, २०११
मित्र असावा तर असा
प्रिय मैत्रणी,
गुड मॉर्निंग. अरेच्या आज लवकर जाग आली वाटतं. फारच छान. म्हणजे मी रोज तुला मित्रत्वाच्या नात्याने फोन करतो याचा चांगला परिणाम झाला तर. अगं, मित्र असावा तर असा आणि मित्रत्व असावं तर आपल्यासारखं. मैत्रीवरून आठवलं बघ. काय आठवलं अस तू विचारणारच. शोलेमधलं ते सुंदर गीत तुला माहीत आहे का? कोणतं काय विचारतेस? चल तर सांगूनच टाकतो तुला. यह दोस्ती हम नही छोडेंगे... किती गहिरं नातं असत ना मित्रत्वाला. अगदी तुझं नि माझं आहे तसं. तुला तर मित्र म्हणजे आरसाच वाटतो. बरोबर ना. आपण कसे आहोत, हे मित्रच चांगलं सांगू शकतात. धडाकेबाज सिनेमा पाहिलास का तू... चक्क पाहिलास.. मग गाणं एकलं असशील. तसं नाही, काही जणांना सवय असते ना गाणं लागल्यावर डुलकी काढायची. अगदी अधिवेशनावेळी नेतेमंडळी काढतात तशी. जाऊ दे. आपण मैत्रीबद्दल बोलत होतो. हा, तर काय ही दोस्ती तुटायची नाय.. मला मैत्री सांगायचीय ती त्या साहेब आणि राव यांच्यातील. आता हे साहेब आणि राव कोण म्हणून विचारलंस ना तर महाराष्ट्राचा अधिवासी दाखला रद्द करून टाकायला सांगेन. अगं, मैत्री असावी तर बाळासाहेब आणि पवारांसारखी. निरागस, निखल आणि दूरदृष्टी असणारी बरं का. महाराष्ट्राचे हे दोन दिग्गज. काय मित्रत्व जपतात म्हणून सांगू. शिकलं पाहिजे आपण. राजकीय पटलावर एकमेकांचे घोडे मारलेत पण मैत्रीच्या पटलावर मात्र राजाप्रमाणे मित्रत्व जपलंय. सो ग्रेट. साहेबांकडून काही प्रसंग निर्माण झाला किंवा साहेबांवर काही प्रसंग पडला की रावसाहेब प्रेमाने येतात भेटायला मातोश्रीवर. अगं परवाचंच बघ ना. संपूर्ण महाराष्ट्र समस्याग्रस्त आहे यावर जेवढा एकोपा नेत्यांनी केला नाही तेवढा एकोपा पवारसाहेबांना मारल्यानंतर झाला. माझ्या मते ही खूप चांगली गोष्ट आहे. निदान महाराष्ट्र एक होऊ शकतो याची अन्य राज्यांना खात्री पटली. शरद पवारांसारखा दूरदृष्टी लाभलेला नेता महाराष्ट्राला लाभलाय. म्हणून पवारांच्या पडली तेव्हा सर्वांना चिडीने जाग आली. आणि साहेबांनी रावांची बाजू घेतली. अगदी एखाद्या जीवलग मित्रानं घ्यावी तशी. मित्र असावा तर असा. अशी राजकीय पटलापलीकडील जपलेली मैत्री विरळाच. तेव्हा मी काय म्हणतो, आपण सलाम करूया त्यांच्या मित्रत्वाला आणि आपली मैत्री मात्र घट्ट करूया.
तुझाच मैत्री जपणारा,
प्रेयस
गुड मॉर्निंग. अरेच्या आज लवकर जाग आली वाटतं. फारच छान. म्हणजे मी रोज तुला मित्रत्वाच्या नात्याने फोन करतो याचा चांगला परिणाम झाला तर. अगं, मित्र असावा तर असा आणि मित्रत्व असावं तर आपल्यासारखं. मैत्रीवरून आठवलं बघ. काय आठवलं अस तू विचारणारच. शोलेमधलं ते सुंदर गीत तुला माहीत आहे का? कोणतं काय विचारतेस? चल तर सांगूनच टाकतो तुला. यह दोस्ती हम नही छोडेंगे... किती गहिरं नातं असत ना मित्रत्वाला. अगदी तुझं नि माझं आहे तसं. तुला तर मित्र म्हणजे आरसाच वाटतो. बरोबर ना. आपण कसे आहोत, हे मित्रच चांगलं सांगू शकतात. धडाकेबाज सिनेमा पाहिलास का तू... चक्क पाहिलास.. मग गाणं एकलं असशील. तसं नाही, काही जणांना सवय असते ना गाणं लागल्यावर डुलकी काढायची. अगदी अधिवेशनावेळी नेतेमंडळी काढतात तशी. जाऊ दे. आपण मैत्रीबद्दल बोलत होतो. हा, तर काय ही दोस्ती तुटायची नाय.. मला मैत्री सांगायचीय ती त्या साहेब आणि राव यांच्यातील. आता हे साहेब आणि राव कोण म्हणून विचारलंस ना तर महाराष्ट्राचा अधिवासी दाखला रद्द करून टाकायला सांगेन. अगं, मैत्री असावी तर बाळासाहेब आणि पवारांसारखी. निरागस, निखल आणि दूरदृष्टी असणारी बरं का. महाराष्ट्राचे हे दोन दिग्गज. काय मित्रत्व जपतात म्हणून सांगू. शिकलं पाहिजे आपण. राजकीय पटलावर एकमेकांचे घोडे मारलेत पण मैत्रीच्या पटलावर मात्र राजाप्रमाणे मित्रत्व जपलंय. सो ग्रेट. साहेबांकडून काही प्रसंग निर्माण झाला किंवा साहेबांवर काही प्रसंग पडला की रावसाहेब प्रेमाने येतात भेटायला मातोश्रीवर. अगं परवाचंच बघ ना. संपूर्ण महाराष्ट्र समस्याग्रस्त आहे यावर जेवढा एकोपा नेत्यांनी केला नाही तेवढा एकोपा पवारसाहेबांना मारल्यानंतर झाला. माझ्या मते ही खूप चांगली गोष्ट आहे. निदान महाराष्ट्र एक होऊ शकतो याची अन्य राज्यांना खात्री पटली. शरद पवारांसारखा दूरदृष्टी लाभलेला नेता महाराष्ट्राला लाभलाय. म्हणून पवारांच्या पडली तेव्हा सर्वांना चिडीने जाग आली. आणि साहेबांनी रावांची बाजू घेतली. अगदी एखाद्या जीवलग मित्रानं घ्यावी तशी. मित्र असावा तर असा. अशी राजकीय पटलापलीकडील जपलेली मैत्री विरळाच. तेव्हा मी काय म्हणतो, आपण सलाम करूया त्यांच्या मित्रत्वाला आणि आपली मैत्री मात्र घट्ट करूया.
तुझाच मैत्री जपणारा,
प्रेयस
शुक्रवार, २ डिसेंबर, २०११
माझं दुसरं घर
प्रिय मैत्रणी,
गुड इव्हिनिंग, अगं आज म्हटलं गुड इव्हिनिंग करूया... वीकेण्ड असला की अनेक जण वीकेण्डला जाण्याचे बेत आखतात... पण तुला सांगू का, मी आता वीकेण्डला माझ्या दुस-या घरी जाण्याचं ठरवलंय... आता दुसरं घर कुठलं ही उत्सुकता लागली असेलच... असो... अशी रागावू नकोस... बरं तर माझ्या दुस-या घराचा पत्ता आहे... मुंबई, डॉक्टर आंबेडकर रोड, रंगारी बदक चाळीतील अभिज्ञान अकादमी... माझ्या या दुस-या घराचं घरपण सांभाळतायंत माझे प्रिय गुरूवर्य, मित्रवर्य प्राध्यापक विजय जामसंडेकर... अभिज्ञान अकादमी ही माणसाला प्रेमपण देणारी एकमेव संस्था आहे... काय देत नाही हे घर मला... सर्वच देतं अगदी अथपासून इथपर्यंत... मी जो काही तुझ्यासमोर आहे ना ती या घराची देणगी आहे... जो जे वांछिल ते... असं माझं हे घर... या घरानं अनेक विद्यार्थ्यांना केवळ उभंच केलं नाही तर त्यांचं आयुष्य घडवलंय... अनेकांना मरणाच्या वाटेवरून नवजीवन दिलंय... अनेकांचे उदध्वस्त संसार फुलवलेत... तर मोडणा-या संसारांना प्रेमाने, विचारांनी, जगण्याच्या दृष्टिकोनानं उभारी दिलीय... अशा माझ्या घराचा असा मोठा परिवार...रमायला आवडतं अशा या परिवारात... मनसोक्त आनंद लुटल्याचा क्षण काही औरच असतो, बघ...
माझं हे संस्थारूपी घर जगावेगळं शैक्षणिक कार्य करतंय...अगदी प्रवाहाच्या विरोधात जाऊन... आजच्या तकलादू आणि खर्चिक शिक्षणपद्धतीमुळे आत्महत्या करणा-या विद्यार्थ्यांना आणि पालकांना माझं घर आधारवड ठरलंय... आणि अजून ठरत आहे... इतकंच नव्हे तर ते अनेकांना अगदी माझ्यासारख्यांना जणू आपलं हक्काचं दुसरं घरच वाटंत... ज्योत से ज्योत.... म्हणतात ना तेच कार्य माझं घरकुल करतंय... गेली अनेक वर्षांपासून आणि तेही अगदी मनापासून...या घरकुलानं शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि समाजातील अनेकांचं जीवन प्रकाशासारखं लख्ख उजळून टाकलंय... आता तू म्हणशील हे कसं काय शक्य आहे, तुला प्रश्न पडणं साहजिकच आहे...माझं घर म्हणजे अभिज्ञान अकादमी सातत्यानं नव्या रचनावादी शिक्षणासाठी विधायक भूमिका मांडतेय... आजच्या बदलत्या जीवनमूल्यांच्या काळात पालकांना मुलांच्या जडणघडणीत जीवन-शिक्षणविषयक समुपदेशन करतेय...एवढंच नव्हे तर विविध शैक्षणिक उपक्रमांची शासन, शिक्षणतज्ज्ञ, शिक्षणसंस्था, शिक्षणप्रेमी आणि माध्यमांनी दखल घेतलीय... आहे की नाही दम... आणि हो खास गोष्ट सांगायची राहूनच गेली....कोणती असं काय विचारतेस... अकादमीने प्रकाशित केलेल्या विशेषांकांना एक नव्हे-दोन नव्हे तर तब्बल अठरा पुरस्कार प्राप्त झालेत... आहे ना अभिमानास्पद आणि गौरवास्पद गोष्ट... गोष्ट असावी तर अभिज्ञान अकादमीसारखी स्वच्छ आणि स्पष्ट...
माझ्या या अकादमीत बौद्धिक चर्चा झडतात... आधुनिक आणि वैचारिक दृष्टिकोन दिला जातो... आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे येथे जीवन घडवलं जातं.... त्यामुळे येथे पाखरांनो परत फिरा असं म्हणावं लागत नाही तर पाखरंच घरट्याकडे म्हणजे अभिज्ञान अकादमीकडे परततात...मनसोक्त बागडण्यासाठी...वैचारिक देवाण-घेवाण करण्यासाठी...मदतीचा हात पुढे करण्यासाठी...आता तूही चल माझ्याबरोबर... कारण घराला प्रेमपण देणारी माणसं घडवतंय हे माझं घरकुल...त्या घरकुलात प्रत्येकाचं स्वागतच होतं... आज तुझंही होईल तेवढ्याच प्रेमानं जेवढं माझं काही वर्षांपूर्वी झालं होतं... चलं, आता बोलण्यात वेळ घालवू नकोस...वाट पाहतंय माझं दुसरं घर...
तुझाच घरकुलवेडा,
प्रेयस
गुड इव्हिनिंग, अगं आज म्हटलं गुड इव्हिनिंग करूया... वीकेण्ड असला की अनेक जण वीकेण्डला जाण्याचे बेत आखतात... पण तुला सांगू का, मी आता वीकेण्डला माझ्या दुस-या घरी जाण्याचं ठरवलंय... आता दुसरं घर कुठलं ही उत्सुकता लागली असेलच... असो... अशी रागावू नकोस... बरं तर माझ्या दुस-या घराचा पत्ता आहे... मुंबई, डॉक्टर आंबेडकर रोड, रंगारी बदक चाळीतील अभिज्ञान अकादमी... माझ्या या दुस-या घराचं घरपण सांभाळतायंत माझे प्रिय गुरूवर्य, मित्रवर्य प्राध्यापक विजय जामसंडेकर... अभिज्ञान अकादमी ही माणसाला प्रेमपण देणारी एकमेव संस्था आहे... काय देत नाही हे घर मला... सर्वच देतं अगदी अथपासून इथपर्यंत... मी जो काही तुझ्यासमोर आहे ना ती या घराची देणगी आहे... जो जे वांछिल ते... असं माझं हे घर... या घरानं अनेक विद्यार्थ्यांना केवळ उभंच केलं नाही तर त्यांचं आयुष्य घडवलंय... अनेकांना मरणाच्या वाटेवरून नवजीवन दिलंय... अनेकांचे उदध्वस्त संसार फुलवलेत... तर मोडणा-या संसारांना प्रेमाने, विचारांनी, जगण्याच्या दृष्टिकोनानं उभारी दिलीय... अशा माझ्या घराचा असा मोठा परिवार...रमायला आवडतं अशा या परिवारात... मनसोक्त आनंद लुटल्याचा क्षण काही औरच असतो, बघ...
माझं हे संस्थारूपी घर जगावेगळं शैक्षणिक कार्य करतंय...अगदी प्रवाहाच्या विरोधात जाऊन... आजच्या तकलादू आणि खर्चिक शिक्षणपद्धतीमुळे आत्महत्या करणा-या विद्यार्थ्यांना आणि पालकांना माझं घर आधारवड ठरलंय... आणि अजून ठरत आहे... इतकंच नव्हे तर ते अनेकांना अगदी माझ्यासारख्यांना जणू आपलं हक्काचं दुसरं घरच वाटंत... ज्योत से ज्योत.... म्हणतात ना तेच कार्य माझं घरकुल करतंय... गेली अनेक वर्षांपासून आणि तेही अगदी मनापासून...या घरकुलानं शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि समाजातील अनेकांचं जीवन प्रकाशासारखं लख्ख उजळून टाकलंय... आता तू म्हणशील हे कसं काय शक्य आहे, तुला प्रश्न पडणं साहजिकच आहे...माझं घर म्हणजे अभिज्ञान अकादमी सातत्यानं नव्या रचनावादी शिक्षणासाठी विधायक भूमिका मांडतेय... आजच्या बदलत्या जीवनमूल्यांच्या काळात पालकांना मुलांच्या जडणघडणीत जीवन-शिक्षणविषयक समुपदेशन करतेय...एवढंच नव्हे तर विविध शैक्षणिक उपक्रमांची शासन, शिक्षणतज्ज्ञ, शिक्षणसंस्था, शिक्षणप्रेमी आणि माध्यमांनी दखल घेतलीय... आहे की नाही दम... आणि हो खास गोष्ट सांगायची राहूनच गेली....कोणती असं काय विचारतेस... अकादमीने प्रकाशित केलेल्या विशेषांकांना एक नव्हे-दोन नव्हे तर तब्बल अठरा पुरस्कार प्राप्त झालेत... आहे ना अभिमानास्पद आणि गौरवास्पद गोष्ट... गोष्ट असावी तर अभिज्ञान अकादमीसारखी स्वच्छ आणि स्पष्ट...
माझ्या या अकादमीत बौद्धिक चर्चा झडतात... आधुनिक आणि वैचारिक दृष्टिकोन दिला जातो... आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे येथे जीवन घडवलं जातं.... त्यामुळे येथे पाखरांनो परत फिरा असं म्हणावं लागत नाही तर पाखरंच घरट्याकडे म्हणजे अभिज्ञान अकादमीकडे परततात...मनसोक्त बागडण्यासाठी...वैचारिक देवाण-घेवाण करण्यासाठी...मदतीचा हात पुढे करण्यासाठी...आता तूही चल माझ्याबरोबर... कारण घराला प्रेमपण देणारी माणसं घडवतंय हे माझं घरकुल...त्या घरकुलात प्रत्येकाचं स्वागतच होतं... आज तुझंही होईल तेवढ्याच प्रेमानं जेवढं माझं काही वर्षांपूर्वी झालं होतं... चलं, आता बोलण्यात वेळ घालवू नकोस...वाट पाहतंय माझं दुसरं घर...
तुझाच घरकुलवेडा,
प्रेयस
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)